अंगात ताप आणि हाताला सलाईनची सुई असतानाही सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट वाखरीत दाखल झाले. मुसळधार पावसामुळे मलपे ओढ्यावरील पूल खचल्याने आणि पालखीतळावर पाणी साचल्याने त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.