जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे फुल शेती करपली. अखेर शेतकऱ्याने स्वतःची जनावरं फुल शेतीत चारण्यासाठी घातली. त्यात बाजारपेठेत फुलाची मागणीही घसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. लावलेला खर्चही यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्याचा निघाला नाही. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.