पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील टँकर अपघातामध्ये गॅस गळती झाली. गेल्या 16 ते 17 तासापासून दोन्हीही महामार्गावर वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींना विमानतळावर पोहोचायचं आहे तर काहींना दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी पोहोचायचं आहे तर काहींना आपला माल मुंबई आणि विमानतळावर पोचवायचा आहे. मात्र या सर्वांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.