खान्देशरत्न, वैराग्यमूर्ती हभप तुकाराम महाराज जेउरकर हे वृंदावन, गोकुळ आणि गोवर्धन अशी 84 कोशांची 50 दिवस खडतर परिक्रमा करून परतल्यानंतर नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकात त्यांच्या चाहत्यांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. हभप तुकाराम महाराज यांचं आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत औक्षण करून तसंच पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आलं.