राज्यामध्ये आज बारावीची म्हणजेच एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू झाली. पुरंदर तालुक्यातील नीरा इथल्या परीक्षा केंद्रावर नीरा ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. ग्रामपंचायत सदस्य, मार्केट कमिटी सदस्य आणि त्यांचे सहकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं.