धाराशिव जिल्ह्यात यंदा सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र आता अनेक भागांत उंट आळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पानांची मोठ्या प्रमाणावर कुरतड होत असल्याचे चित्र दिसत आहे. पानांचे नुकसान वाढल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.