सध्या भुसावळ शहराचा पारा 45 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांची उन्हाने लाही लाही होत आहे. या तीव्र उन्हाचा फटका मुक्या पशु-पक्ष्यांनाही बसत असून पाण्यासाठी त्यांची प्रचंड वणवण होत आहे. हीच गरज ओळखून इथल्या एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'जीव द्या जल सेवा' अभियान राबवून माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.