ईसापुर धरणाचे तीन दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून पेनगंगा नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील धरण परिक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.