जळगावच्या धरणगाव तालुक्यात काल रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.त्यावेळी जोरदार वादळी वाऱ्यामुळे झूरखेडा येथे सुमनबाई गायकवाड यांच्या घरावरील संपूर्ण पत्रा उडाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्र उडून गेल्यामुळे पावसामुळे घरातील धान्य तसेच इतर वस्तू भिजल्याने नुकसान झाले आहे.या प्रकरणी तातडीने पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी या महिलेने केली आहे.