जळगावच्या धरणगावातून खाज्याजी नाईक यांच्या शौर्य स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. धरणगाव येथील रेल्वे स्थानकावरील खाज्याजी नाईक यांच्या स्मृतिस्थळी पूजन तसेच पुष्पहार अर्पण करत यात्रेला शुभारंभ झाला. 9 ते 11 एप्रिल दरम्यान ही तीन दिवसीय कलश यात्रा पार पडणार आहे.