जळगाव मुक्ताई नगर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीची कामे सुरू केली असताना आतापासूनच शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. एकीकडे मजुरीचे दर दुपटीने वाढले असून त्यामुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे चार ते पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची कामे ठप्प झाली असल्याने शेतकरी आणि ट्रॅक्टरधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.