जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीच्या नदीपात्राला जलपर्णीने मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे. जलपर्णीच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रमाणामुळे संपूर्ण नदीपात्र हिरव्या आच्छादनाखाली गेले असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मंदावला आहे. या वाढत्या जलपर्णीमुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.