दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव संकल्पनेवर आधारित चित्ररथाने २०२६ चा प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली असून मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे अभिनंदन केले.