ऐन उन्हाळ्याच्या काळात येवला तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सकाळपासूनच आकाश पूर्णतः ढगांनी व्यापलेले दिसत आहे, दरम्यान, काल रात्री काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या या अवकाळी सरींमुळे आधीच काढून ठेवलेल्या कांद्याला ओलावा लागू नये, यासाठी शेतकरी अनेक ठिकाणी कांद्यावर ताडपत्री किंवा इतर आच्छादन घालून त्याचे संरक्षण करत आहेत.