लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावात दवंडी पिटून सावध राहण्यास सांगितले जाते आहे. मोठा पाऊस झाला नसल्याने चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्यास सांगितले जाते आहे. गावात संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवा असेही दवंडी पिटून सांगितले जाते आहे.