भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने आळंदी ते पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात आले आहे. या मार्गावर जेजुरी जवळील तक्रार वाडी येथे टोल नाका उभारण्यात आला आहे.आजपासून या महामार्गावर टोल वसुली सुरू करण्यात आला आहे. टोल नाक्यापासून तालुक्यातील 20 किलोमीटर अंतरावरील नागरिकांच्या वाहनांना टोल आकारू नये या मागणीसाठी पुरंदर तालुका मनसे, संभाजी ब्रिगेड आणि ग्रामस्थांनी टोल नाक्यावर आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत टोल वसुली बंद ठेवा अशी मागणी वर आंदोलक ठाम आहेत. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी हा महामार्ग विकसित केला असून वारकरी बांधव, खंडोबा भक्त,स्थानिक नागरिक,शेतकरी, कामगार तसेच कोणालाही टोल आकारू नये अशी मागणी पुढे येत आहे. पुरंदर तालुका मनसे, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस,पंचक्रोशीतील शेतकरी,ग्रामस्थ विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाले आहेत.