अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युरिया व इतर खतांच्या खरेदीसाठी आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विविध कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रति शेतकरी केवळ एक ते दोन पोती खत दिले जात असून त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी खत वितरणात मनमानी होत असल्याचा आरोप करत सातबारा पाहून आवश्यकतेनुसार खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे... तर याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी गणेश सोनोने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे....!