राज्यात जून महिना सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.