नंदुरबार शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची कृपादृष्टी झाली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा संपली असून वरुणराजाची नंदुरबारकरांवर कृपादृष्टी झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे रखडलेल्या ४६ हजार एकर क्षेत्रावरील पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे.