नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोळेगाव येथील कुमारी आदिती संदीप मुदगुल हिने अयोध्या ते नेपाळ असा तब्बल ६७० किलोमीटरचा विक्रमी धाव प्रवास पूर्ण करत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. ५ मे रोजी अयोध्येतील राम मंदिरातून सुरू झालेली ही धाव मोहिम तिने अवघ्या ७ दिवस १५ तासांत पूर्ण केली. प्रचंड उष्णता, शारीरिक ताण आणि नेपाळमधील खडतर डोंगर-दऱ्यांचा सामना करत आदितीने १२ मे रोजी नेपाळमध्ये धाव पूर्ण केली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘मिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे