अभिनेता सुमीत राघवनने दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरुन सरकार आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. सुमीत उपरोधिकपणे म्हणतोय की, जे चालु आहे ते चालु राहु द्या सरकारविरोधात काही बोलू नका.सरकारविरोधात बोलल्याने देशाचा अपमान होईल.महाराष्ट्रात आपण बघतोच आहे की सरकारविरोधात बोलल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार म्हणतेय की हा राज्याचा अपमान आहे. महाराष्ट्राचे नेते म्हणतात ही मुले आंतकवादी आहेत. आम्ही आंतकवादी आहोत का ? अभिनेता अतुल कुलकर्णी याने त्याच्या फेसबुक पेजवर अभिनेता सुमीत राघवन याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.