संत सावता माळींच्या भेटीला पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचे अरणकडे प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्याला तब्बल २०५ वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारीनंतर पंढरपुरातून निघणारी ही पालखी संत सावता माळींच्या मूळ गावी अरण येथे पोहोचते. या सोहळ्याला दरवर्षी हजारोंची गर्दी होत असल्याने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याप्रमाणे सरकारने या सोहळ्यासही सुविधा द्याव्यात, अशी मागणी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली आहे.