नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने पपई उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरात पपईच्या दरात तब्बल दहा रुपयांनी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. दर घसरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आली.