करवंदाच्या विक्रीतून दुर्गम डोंगर भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला असून शेकडो जणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. दारोदारी फिरून 20 ते 50 रुपयांपर्यंत वाट्यावर मिळणारी गोड, आंबट चवीच्या करवंदाची ग्रामीण भागातील महिला विक्री करत असून नागरीकही मोठ्या उत्सुकतेने ही करवंद खरेदी करत आहेत. तर इतर जिल्ह्यातील व्यापारी करवदांची प्रतवारी उकृष्ट असल्याने तालुक्यातील बाजारपेठेतून करवंदांची खरेदी करून घेऊन जातं असल्याने करवंद विक्रीतून तालुक्याची आठवड्याला लाखोंची उलाढाल होतं आहे.