पुणे : लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. इंद्रायणीला प्रदुषण मुक्त करण्यासाठी सुमारे 400 कोटींहून अधिकचा निधी खर्च करण्याचा आराखडा आखण्यात आला आहे. नमामी इंद्रायणी या प्रकल्पाची घोषणा देखील करण्यात आलीय. मात्र राज्य सरकारच्या ह्या सर्व घोषणा पोकळ ठरल्या असून, मागील 6 महिन्यात इंद्रायणी नदीच्या पात्रात थेट मैलामिश्रित आणि केमिकल मिश्रित सोडले जाणारे पाणी रोखण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.