रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टार बॉल्स आढळून आल्याने पर्यावरणासह मत्स्य व्यवसायावर गंभीर संकट निर्माण झालं आहे. समुद्रात होणाऱ्या तेलगळतीमुळे तयार होणारे हे काळपट डांबरासारखे गोळे किनाऱ्यावर वाहून येत असून त्यामुळे मासे आणि सागरी जीवसृष्टीवर विषबाधेचं सावट निर्माण झालं आहे.