तब्बल पंधरा दिवसाच्या खंडानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक पिके करपू लागली होती तर काही ठिकाणी पिकांनी अक्षरशः माना टाकल्या होत्या त्यामुळे आजच्या पावसाने या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.