महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे प्रमुख मार्गांवर मोठे खड्डे पडले असून, नागरिकांना आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर सह्याद्री ट्रेकर्स आणि स्थानिक व्यापारी, नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे भरण्याची मोहीम सुरू केली आहे.. महाबळेश्वर मध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे ज्या भागात रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी मागील दहा दिवसापासून प्रशासनाची वाट न बघता स्थानिकांनी पुढाकार घेऊन रस्ते बुजवण्यास सुरुवात केली आहे.