काल परवा सायंकाळी झालेल्या पावसाने सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊस व भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, सुसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने ऊस पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.