संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही. शरद पवारांप्रमाणे शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे ते पाईक आहेत. भाजपसोबत असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे स्वतःचे विचार सोडले नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.