संजय राऊत यांनी इराण-इस्रायल युद्धामुळे भारतासमोरील संकटावर चिंता व्यक्त केली आहे. मध्य पूर्वेतील युद्धाच्या ज्वाळा भारतापर्यंत पोहोचल्या असून, या जागतिक घडामोडींमध्ये भारताची आणि पंतप्रधानांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा होणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.