सातारा जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी आज दिवसभर उत्साहात मतदान सुरू असतानाच नवरदेवा हळदीच्या अंगाने लोकशाहीचा पवित्र हक्क बजावला. कराड तालुक्यातील भैरवनाथनगर येथील युवा उद्योजक ऋतुराज भालचंद्र थोरात यांचा आज विवाह होता. दिवसभर विवाहाची गडबड असताना देखील हळद लागल्यानंतर नवरदेव घोड्यावरूनच थेट भैरवनाथनगर येथील मतदानकेंद्रावर पोहचला आणि मतदान केले. जितकं लग्न महत्वाचं आहे, तितकंच मतदानही महत्वाचं आहे. त्यामुळे मी मतदान केलं असे नवरदेवाने सांगितले.