पुण्याच्या भोर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांची जोमदार उगवण झाली. बळीराजा सुखावला. दमदार पावसामुळे तालुक्यातील शेती कामांना वेग आला असून, पिके जोमदार आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोयाबीन, भुईमूग, ज्वारीची, घेवडा अशी खरीपातील पेरणी पूर्ण झाली असून..जमिनीला समाधानकारक ओल मिळाल्यामुळे पेरलेली पिके पिवळी न पडता गर्द हिरवीगार आणि निरोगी दिसत आहेत.