उन्हाळ्याची चाहूल लागताच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकेत दिसू लागले आहेत. अनेक गावांतील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली असून फेब्रुवारी अखेरपासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम भूजलसाठ्यावर होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने विहिरींवर अवलंबून असतात. मात्र पाणी तळाशी जाऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.आगामी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे...