जंगलात अन्न-पाण्याची टंचाईमुळे नंदुरबार शहरात माकडांचा धुमाकूळ सुरु झाला आहे. विद्यार्थी-शिक्षकांवर या माकडांनी हल्ले केले आहेत. माकडांच्या हल्ल्याने शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. माकडांच्या उपद्रवामुळे अनेक दुकानांचेही नुकसान झाले आहे. वन विभागाकडे कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्यामुळे दोन दिवसापासून माकडांना पकडण्यात अपयश येत आहे.