पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत खोऱ्यातील दुर्गम पोळे गावातील कंधारवस्ती, देवमाळ वस्ती, ढेबेवस्ती परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज डोक्यावर हंडा घेऊन एक ते दीड किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे.