राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा सुरू असली तरी, शरद पवार यांनी सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकांपुढील संकटे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करणे, यावरच त्यांचे लक्ष केंद्रित असल्याचे त्यांनी नमूद केले.