जालना शहरातील रिक्षा चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण शहरातील एलपीजी ऑटो गॅस पंपावर गॅसचा साठा संपल्याने परीक्षा चालक सध्या हैराण झाले आहेत. काल ज्या ठिकाणी गॅस उपलब्ध होता त्या ठिकाणी रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या, मात्र आज साठा संपला असल्याने काही रिक्षा या गॅस अभावी उभ्या आहे. त्यामुळे ऑटो गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाची वाहतूक मंदावण्याची शक्यता असून रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली. शिवाय दुसऱ्या बाजूला गॅसच्या दरात झालेली दर वाढ यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर जास्त परिणाम होणार आहे.