नंदुरबार बाजार समितीत ग्रामीण भागातून विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाला आणि फळांवर आता प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ आणि घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.