एकीकडे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली तर दुसरीकडे मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. आकाशात काळे ढग दाटून आल्याने सूर्य ढगामागे लपला आहे अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागला आहे. उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.