राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एकीकडे निसर्गाचा पारा चढत असतानाच, दुसरीकडे बाजारपेठेत लिंबाच्या दरानेही मोठी उसळी घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे थंड पेयांची मागणी वाढली आहे. परिणामी, बाजारपेठेत लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमत 10 रुपयांवर पोहोचली आहे.