ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. भातसा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.