‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आज जळगावच्या चाळीसगावात आगमन होताच नागद चौफुलीवर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांच्या वर्षावात यात्रेचे आगमन साजरे करण्यात आले. यावेळी महिलांसह बालिकांनी डोक्यावर कलश घेऊन पारंपारिक पद्धतीने यात्रेच्या पुढे चालत सहभाग नोंदविला. या जलयात्रेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.