समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार फूट उंचीवरील रत्नागिरीतील रघुवीर घाटाकडे पर्यटकांची पावले वळली आहेत. दाट धुके, हिरवाई आणि कड्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. पावसाळ्यात रघुवीर घाट निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे.