परभणी : कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली असून आपल्या विविध मागण्यांसाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. कृषी विभागाने लावलेल्या जाचक अटींच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये अनधिकृत एचटीबीटी बियाणे विक्री, खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग यासह, अन्य प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना, येणाऱ्या काळात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.