मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक कोंडी कायम असून, ती सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.