विरार पश्चिम येथील म्हाडा कॉलनीतील रहिवाशानी वसई विरार महापालिकेवर धडक मोर्चा काडून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. म्हाडा कॉलनीत 9500 घर आहेत. मात्र कोणतीही सोयी सुविधा दिल्या नाहीत. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी टंचाई, दूरवस्थेत पडलेले खेळाचे मैदान, इत्तर मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने प्रशासना विरोधात तीव्र निषेध व्यक्त करीत आंदोलन केले आहे.