वाशिम जिल्ह्यातील अनेक भागांत कांदा बिजवाई पिक घेतलं जातं. मात्र सध्या रस्त्यालगतच्या शेतांमध्ये बिजवाई कांदा पिकावर धुळीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. जड वाहनांची सततची ये-जा आणि खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते. हीच धूळ थेट कांद्याच्या फुलांवर साचत असल्याने फुलांची नैसर्गिक प्रक्रिया बाधित होत आहे. कांदा बिजवाई पिकामध्ये फुलांवर परागीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र धुळीच्या थरामुळे ही प्रक्रिया मंदावते आणि बियांची निर्मिती कमी होते. परिणामी उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.