वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे अडोळ प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या रिसोड शहरासह प्रकल्प शेजारील गावांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. सध्या आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून उपलब्ध पाणी अत्यंत मर्यादित आहे.