पवनी तालुक्यातील अड्याळ येथील वृंदावन लेआउटमधील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात घागर मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. गेल्या १५ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत महिलांनी संताप व्यक्त केला.